मुंबई शहरात पावसाची नोंद २.८ मि.मी., पूर्व उपनगरांत ५.३ मि.मी. तर पश्चिम उपनगरात ७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
बोरीवलीत पावसाची नोंद १.०२ मि. मी
कांदीवली येथे १.५२ मि. मी.
दिंडोशी येथे १.५२ मि. मी.
अंधेरी येथे ४.०६ मि. मी.
वांद्रा येथे ३.३०मि. मी.
देवनार येथे १.५२ मि. मी.
वडाळा येथे ३.०५ मि. मी.
दादर येथे ५.०८ मि. मी. पावसाची नोंद झाली.
स्त्रोत: ‘पावसाने मुंबई, ठाणेकरांची त्रेधातिरपीट’ १७ ऑक्टोबर २०११, लोकसत्ता
राज्यात गेल्या आठवड्यात धुवाधार बरसलेल्या पावसामुळे सरासरी
राज्यात गेल्या आठवड्यात धुवाधार बरसलेल्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा आणि बीड या ८ जिल्ह्यांत १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.
धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा या दहा जिल्ह्यांत १०० ते १२० टक्के पाऊस झाला आहे.
नाशिक, सांगली, जालना, उस्मानाबाद, नांदेड परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या १५ जिल्ह्यांत ८० ते १०० टक्के एवढा पाऊस झाला आहे.
राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३२.३४ लाख हेक्टर आहे.
आतापर्यंत १३५.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी क्षेत्राशी तुलना करता १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
एकूण बियाण्यांची गरज १८.३५ लाख क्विंटल असताना १८.४५ लाख क्विंटल म्हणजेच १०० टक्क्यांहून अधिक बियाणांचा पुरवठा झाला आहे.
राज्यात बीटी कापूस बियाणांची एकूण १८० लाख पाकिटांची मागणी असून २०० लाख पाकिटांचा पुरवठा झाला आहे.
राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ८१ टक्के म्हणजेच २९ लाख ६३६ दशलक्ष घन मिटर पाणी साठा झाला आहे.
स्त्रोत: ‘राज्यात पावसाने सरासरी ओलांडली’ ८ सप्टेंबर २०११, महाराष्ट्रा टाईम्स्
राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ७७ टक्के साठा तयार झाला आहेः
कोकण (९२ टक्के), मराठवाडा (६० टक्के), नागपूर (७५ टक्के), अमरावती (६६ टक्के), नाशिक (६५ टक्के) व पुणे विभागातील जलाशयांमध्ये क्षमतेच्या ७४ टक्के साठा झाला आहे.
राज्यातील सर्व मोठी धरणे चांगली भरली असली तरी मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात आतापर्यंत फक्त ४४ टक्केच साठा झाला आहे.
मराठवाडय़ातील विष्णूपुरी (४९ टक्के), निम्न तेरणा (४० टक्के), मांजरा (९७ टक्के), उध्र्व पेनगंगा (७३ टक्के) भरले आहे.
ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणारे सूर्या आणि बारवी ही धरणे भरून वाहू लागली आहेत.
स्त्रोत: ‘पावसाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पिकांचे नुकसान’ ६ सप्टेंबर २०११, लोकसत्ता
मुंबई व पाणी पुरवठा वउपाययोजनाः
सध्या मुंबईला तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणिविहार या धरणांमधून प्रतिदिनी ३३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मुंबईकरांना सध्या प्रतिदिनी प्रतिमाणशी ९० लिटर पाणी मिळतआहे.
नवीन इमारतींना प्रतिदिनी प्रतिमाणशी ४५ लिटर पाणी देण्याचानिर्णय पालिकेने घेतला आहे.
पाणीगळती आणि चोरीमुळे त्यापैकी ७०० ते ७५० दशलक्ष लिटर पाणी वायाजात आहे. म्हणजे आजमितीस प्रत्यक्षात प्रतिदिनी २६५० ते २६०० दशलक्ष लिटर पाणीमुंबईकरांपर्यंत पोहोचत आहे.
मुंबईची लोकसंख्या विचारात घेतल्यास आजघडीला शहराची दैनंदिन तहानभागविण्यासाठी प्रतिदिनी ४२०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
८५० दशलक्ष लिटर पाणी पुरविण्यास मुंबई महापालिका असमर्थ ठरलीआहे.
मुंबई महानगर पालिकेने आता जलबोगद्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पहाती घेतला आहे.
तानसा पूर्व आणि पश्चिम, उध्र्व वैतरणा आणि वैतरणा जलवाहिन्यांचेरुपांतर ३००० मि.मी. व्यासाच्या भूमीगत बोगद्यामध्ये करण्यात येत आहे.
मरोशी-रुपारेल जलबोगदा प्रकल्पाशी निगडीत २५०० मि.मी. व्यासाच्याभांडुप-मरोशी जलवाहिनीवर एक २४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम अलीकडेचपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले.
गिरगावातील स. का. पाटील उद्यान ते क्रॉस मैदान आणि स. का. पाटीलउद्यान ते मलबार हिल दरम्यान जलबोगदा उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबईचा पाणीपुरवठासुरक्षित व्हावा यासाठी सुरू असलेली जलबोगदा प्रकल्पाची कामे २०१२ पर्यंत पूर्णहोण्याची अपेक्षा आहे.
नवी मुंबई :
नवी मुंबई पालिकेने दहा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील मोरबेधरण (महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अर्धवट सोडलेले) विकत घेण्याचा घेतलेला निर्णयहा सर्वात दूरदर्शी आणि महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसून येते.
मोरबे धरणाची क्षमता ४५० दशलक्ष लिटर आहे. त्यातील २७० दशलक्षलिटर पाणी नवी मुंबई पालिका क्षेत्राला उपलब्ध होत असून १२० दशलक्ष लिटर पाणीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) पनवेल, कळंबोली, जेएनपीटी भागाला देते.
हेटवणे धरणापासून येणार्या जलवहिन्या काही प्रमाणात शहरातून जातअसल्याने अत्यावश्यक म्हणून पालिका या धरणातून २० ते २५ दशलक्ष पाणी घेण्यातयेते.
हेटवणे धरणाची क्षमता १५० दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची आहे.
या धरणाचे २७ दशलक्ष पाणी सध्या जलवहिन्यांच्या मार्गात येणार्या१७ गावांना दिले जात आहे.
हेटवणे धरण असलेल्या तालुक्यात (पेण) बाळगंगा धरण तयार होत असूनया धरणाची क्षमता ३५० दशलक्ष लिटर इतकी आहे. हे पाणी नवीन विमानतळ आणित्याअनुषंगाने येणारे हॉटेल्स, नागरी वसाहती, यांना पुरविण्यात येणारआहे.
स्त्रोत: ‘पाणीगळती, चोरीवर जलबोगद्यांचीमात्रा-प्रसाद रावकर’,१६ जानेवारी २०११, लोकसत्ता.
मुंबईची लोकसंख्या व भविष्यात होणारापाणी पुरवठा:
अ.क्र.
वर्ष
लोकसंख्या
पाणी
(दशलक्ष लिटर)
१
१९५१
३० लाख ८२ हजार
-
२
१९९१
९८ लाख
-
३
२०११
एक कोटी ३७ लाख
३७२०
४
२०२१
एक कोटी ७० लाख
४४०८
५
२०३१
एक कोटी ९० लाख
४९२७
६
२०४१
दोन कोटी १० लाख
५३८५
७
२०५१
दोन कोटी ३० लाख
५८८५
८
२०६१
दोन कोटी ४० लाख
६३४१
स्त्रोत: ‘२०६१ मध्ये मुंबईला मिळणारप्रतिदिनी सात हजार दशलक्ष लिटर पाणी!-संदीप आचार्य’,१६ जानेवारी २०११, लोकसत्ता.
मुंबईला पाणीपुरवठा करणारेतलावः
मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा आणिभातसामध्ये अनुक्रमे एक लाख २१ हजार २९३, एक लाख ४१ हजार ८८६, २७ हजार २८२, सातहजार ९३६, दोन लाख ३४ हजार ५९६ व सात लाख ६१ हजार ९०० असा एकूण १२ लाख ९४ हजार ९०२दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध आहे.
दि ९ नोव्हेंबर २०१० रोजी दिवसभरात कुलाबा येथे२.४ मिमी, गवाणपाडा (मुलुंड) येथे ३.६ मिमी, भायखळा येथे ०.१ मिमी, दादरमध्ये १.३मिमी आणि धारावीत १.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईच्या हवामानखात्यातीलअधिकार्यांनी सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ पोस्ट-मान्सून (मान्सूननंतरचा) कालावधी मानला जातो.
हिमालयपर्वतरांगेच्या एका बाजूला वर्षांला सरासरी५०० मिलिमीटर पाऊस पडतो, तर दुसर्या बाजूला ३००० मिलिमीटर इतका सरासरी पाऊसपडतो.
स्त्रोत: ‘हिमालयातील हवामानाची रहस्ये..आता येतील मुठीत’! ४ सप्टेंबर २०१०, लोकसत्ता
वाहतूक प्रवासीः
साधारणत: ६८ टक्के लोक लोकलने, तर २२ टक्के बसनेप्रवास करतात, तर आठ टक्के प्रवासी रिक्षाचा उपयोग करतात. याउलट ४२ टक्के श्रीमंतलोक मात्र कारने तर २८ टक्के लोकलचा वापर करतात. सर्वेक्षणानुसार ठाणे, कल्याण, पेण-रायगड या शहरातील वाहनांची संख्या मुंबईपेक्षा अधिक आहे. सकाळ आणि संध्याकाळीपिकअवरमध्ये हवेत सोडल्या जाणार्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३३ ते ७५टक्क्यांपर्यंत जाते. सध्याच्या विमानतळाची रहदारी वर्षांला २५ दशलक्ष प्रवासी इतकीआहे. पाच वर्षांत विमानाने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणातवाढली आहे. सध्याच्या मुंबईच्या विमानतळाचे क्षेत्र फक्त ७०० हेक्टरआहे.
पुण्यात एका दिवसात १८१.३ मिलिमीटर पडलेल्याउच्चांकी पावसाचा सार्वकालीन विक्रम ठरला. या पावसाने पुण्यातील पावसाचा ११८वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. पाषाण येथेही विक्रमी १७२.६ मिलिमीटर इतक्या पावसाचीनोंद झाली.
स्त्रोत: ‘पुण्यात १८१.३ मिलिमीटरचासार्वकालीन उच्चांक!’, ५ ऑक्टोबर २०१०, लोकसत्ता.
गणेशोत्सवः
दरवर्षी गणपती विसर्जनाच्या दरम्यान सुमारे दीडकोटी किलो पीओपी पाण्यात जमा होते.
प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कॅल्शियम सल्फेट असते.मिश्रण पूर्णत: विरघळण्यासाठी सुमारे २० ते २५ वर्षांचा कालावधीलागतो.
स्त्रोत: ‘४५ हजार टीपकागदांतून साकारली१४ फुटी मूर्ती’,१५ सप्टेंबर २०१०, लोकसत्ता
हवामानबदलासाठीसंशोधनः
भारताने १९८४ साली अंटाक्र्टिकावर ‘दक्षिणगंगोत्री’ हा पहिला तळ उभारला. त्यानंतर १९८९ साली ‘मैत्री’ हा दुसरा तळउभारल्यानंतर ‘दक्षिण गंगोत्री’चे काम थांबविण्यात आले. आता मात्र ‘मैत्री’ व तिसरातळ ‘भारती’ या दोन्ही तळांवर संशोधनाचे कार्य सुरू राहील. एकपेक्षा अधिक तळअसलेल्या नऊ देशांमध्ये आता भारताचा समावेश होणार आहे.
स्त्रोत: हवामानबदलासाठी भारताचेअंटाक्र्टिका, आक्र्टिकवर संशोधन!,२ सप्टेंबर २०१०, लोकसत्ता
भारतातील दरमाणशी पाण्याची कमी होत जाणारीउपलब्धताः
१९५१ सालामध्ये दरमाणशी ५१७७ घनमीटर पाणी उपलब्धहोते. १९९१ सालामध्ये हाच आकडा २२०९ घनमीटरवर घसरला आणि २००१ मध्ये तर तो १८२०घनमीटर इतका झाला.
स्त्रोत: ‘धोक्याची घंटा!’, १६ नोव्हेंबर२०१०, महाराष्ट्र टाईम्स
जागतिक परिषदेत २०१० हे उष्ण वर्ष म्हणूनघोषितः
जागतिक हवामान संस्थेने सादर केलेल्या अहवालात यावर्षात सर्वाधिक उष्णता नोंदविली आहे. २००१ ते २०१० जागतिक तापमानाची सरासरी ०.४६सेल्सिअस नोंदविण्यात आली आहे. ही नोंद १९६१ ते १९९०च्या सरासरापेक्षा जास्तअसल्याचेही अहवालात नमूद केले आहे. उष्णतेचे प्रमाण आफ्रिका, आशिया खंडातील काहीभागात जास्त नोंदविले आहे. या अहवालात पाकिस्तानमधील पाऊस ३०० मिमी नोंदविला असूनतो सर्वाधिक असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्त्रोत: ‘२०१० हे सर्वाधिक उष्ण वर्ष’,४डिसेंबर २०१०, महाराष्ट्र टाईम्स.
२०१० देशातील आतापर्यंतचे सर्वात उष्णवर्ष ठरल्याचा विक्रमः
अ.क्र.
वर्ष
तापमान अंश सेल्सिअस
१
२०१०
२५.८०
२
२००९
२५.७९
२०१० हे वर्षी २५.८० अंश सेल्सिअस इतके सरासरी तापमान नोंदवले गेले असून, तोभारतातील गेल्या ११० वर्षांमधील हा उच्चांक ठरला आहे.
भारतीय हवामानशास्त्रविभागाने १९०१ पासूनची सरासरी तापमानाची आकडेवारी जाहीर केल्यानुसार २००१ ते २०१०हे दशकही आतापर्यंतचे सर्वात उष्ण दशक ठरले आहे.
२००१ ते २०१० हे दशकसरासरीपेक्षा ०.४ अंशांनी अधिक उष्ण ठरले आहे.
गेल्या ११० वर्षांतील पहिलीतीन सर्वात उष्ण वर्षेसुद्धा याच दशकातील आहेत. २०१०, २००९ आणि २००२ अशी ही तीनवर्षे आहेत.
स्त्रोत: ‘२०१० ठरले आतापर्यंतचे सर्वातउष्ण वर्ष!-अभिजित घोरपडे’,१७ जानेवारी २०१०, लोकसत्ता.
सायलेन्स झोन / शांतताक्षेत्रः
मुंबई शहर जिल्हाधिकार्याच्या हद्दीत २ हजार २३७ठिकाणे सायलेंट झोन जाहीर झाली आहेत
स्त्रोत: ‘एकच थैमान.. ’, ११ मार्च २०११, लोकसत्ता.
मुंबईतील दशकातील मार्चमधील तापमानः
अनुक्रमांक
वर्ष
तापमान (अंशसेल्सिअसमध्ये)
१
२००१
३४.३
२
२००२
३९.६
३
२००३
३७.४
४
२००४
३९.३
५
२००५
३६.२
६
२००६
३८.०
७
२००७
४०.०
८
२००८
३५.७
९
२००९
३७.८
१०
२०१०
३८.०
स्त्रोत: ‘मुंबईत 'हीट'मार्च,१६ मार्च २०११, महाराष्ट्र टाईम्स.
मुंबई महानगर क्षेत्रात वाहनांचा सुळसुळाटः
अनुक्रमांक
ठिकाण
वर्ष १९८०
वर्ष १९९०
वर्ष २०००
वर्ष २०१०
१
मुंबई
२,८६,१३२
६,०९,९०४
९,६०,६८०
१६,७४,३६६
२
ठाणे
३६,११२
१६,६४८५
७२,०५१५
२३,५८,८३८
३
महाराष्ट्र
७,४९,५३५
२४,९८,२२०
६१,१३,५२३
१,५७,६८,४२१
स्त्रोत: उदंड जाहली वाहने, १२ मार्च २०११, लोकसत्ता.
भारताचे हवामान नेमके आहे तरी कसे आणि त्यात अलीकडच्या काळात कोणते बदल झाले आहेतः
भारताच्या पश्चिमेला राजस्थानच्या वाळवंटात वर्षांला जेमतेम १३० मिलिमीटर पाऊस पडतो.
ईशान्य भारतात मेघालयात मौसीराम येथे त्याचे प्रमाण तब्बल पंच्याऐंशी-नव्वद पटीने जास्त आहे.
राजस्थानच्या वाळंवटात वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी केवळ वीस दिवस पावसाचे असतात, तर ईशान्य भारतात पावसाचे दिवस १८० च्या आसपास असतात.
भारतात वर्षांला सरासरी ११८२.८ मिलिमीटर पाऊस पडतो.
सर्वाधिक वाटा म्हणजे ७४.२ टक्के पाऊस मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये (जून ते सप्टेंबर) पडतो.
सर्वात मुख्य महिना आहे- जुलै. एकटय़ा जुलैमध्ये वर्षभतील २४.२ टक्के पाऊस पडतो.
ऑगस्टमघ्ये २१.२ टक्के, सप्टेंबरमध्ये १४.२ टक्के, तर जूनमध्ये १३.८ टक्के पाऊस पडतो.
पावसाळ्याशिवायच्या इतर आठ महिन्यांमध्ये २५.८ टक्के पाऊस पडतो.
तापमानात ०.५६ अंशांची वाढ देशातील तापमानाची १९०१ ते २००९ या काळातील आकडेवारी असे सांगते की, गेल्या शंभर वर्षांच्या काळात देशाच्या सरासरी तापमान ०.५६ अंश सेल्सिअसने वाढले आहे.
जागतिक तापमानातील वाढ ०.७४ अंशांची आहे.
तापमानात झालेली सर्वाधिक वाढ मुख्यत: पावसाळ्यानंतरच्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमधील आहे. या महिन्यांमधील तापमान ०.७० ते ०.७७ अंशांनी वाढले आहे.
याउलट मान्सूनच्या काळातील तापमानवाढ सर्वात कमी (केवळ ०.३३ अंश) आहे.
स्त्रोत: ‘सद्य:स्थिती.. भारतीय हवामानाची - अभिजित घोरपडे’, ७ एप्रिल २०११, लोकसत्ता.
मुंबईला होणारे पाणी पुरवठ्याचे प्रमाण (दररोज):
शहर लोकसंख्या-३५ लाख पाणी पुरवठा-११४० दशलक्ष लिटर
पूर्व उपनगरे-लोकसंख्या-३६ लाख पाणी पुरवठा-८९० दशलक्ष लिटर
पश्चिम उपनगरे-लोकसंख्या-५९ लाख पाणी पुरवठा-१३२० दशलक्ष लिटर
मुंबईला सध्या दररोज होणारा पाणी पुरवठा-३३५० दशलक्ष लिटर
प्रत्यक्षात पाण्याची मागणी-४४५० दशलक्ष लिटर
मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबइत आखलेले महत्वाकांक्षी प्रकल्पः
मरोळ ते रुपारेल कॉलेज- टनेल एकूण खर्च ४१५ कोटी रुपये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट २०१२
रुपारेल कॉलेज ते महालक्ष्मी रेसकोर्स खर्च ६१ कोटी
महालक्ष्मी रेसकोर्स ते मलबार हिल टेकडी खर्च ६१ कोटी रु.
मलबार हिल ते क्रॉस मैदान खर्च २०० कोटी रु. प्रकल्प पूर्ण डिसेबर २०११
वेरावली ते यारी रोड टेकडी खिंर्च १४३ कोटी रु. पूर्ण नोव्हेंबर २०११
गुंदवली ते कापूरबावडी ते भांडूप कॉम्लेक्स खर्च ३ हजार कोटी रु. काम सुरु सप्टेंबर २०११
काम पूर्ण डिसेंबर २०१४ द्य भांडूप ते मालाड ते कांदिवली टनेल खर्च १६५ कोटी रु.किंग्ज सर्कल ते शिवडी खर्च १७ कोटी रु.
स्त्रोत: ‘पाणी पाणी रे... - राजेश चुरी ’, २१ मे २०११, महाराष्ट्र टाईम्स.
जूनच्या मध्यापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरीः
मराठवाडय़ात १ जूनपासून ३ जुलैपर्यंत पडणार्या सरासरी पावसाच्या तुलनेत या वेळी केवळ ४५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.
विदर्भात ७८ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात ८२ टक्के पाऊस झाला आहे.
कोकणामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
स्त्रोत: ‘दडी मारण्याची पावसाची परंपरा यंदाही कायम!’ ४ जुलै २०११, लोकसत्ता
मुंबई व परिसरातील पाऊस:
मुंबईत आज यंदाच्या मोसमातील सर्वाधिक १६८.५ मिमी पावसाची नोंद झाली.
सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार या वेळेत शहरात सरासरी २९.४५ मिमी, पूर्व उपनगरांत ८३.३८ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ६८.४२ मिमी पाऊस कोसळला.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आज ४.०७ मीटरची भरती होती.
स्त्रोत: ‘पहिल्याच दमदार पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट’ ८ जुलै २०११, लोकसत्ता
राज्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी पाणीसाठय़ाची नोंदः
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मोठय़ा, मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ३१ टक्के दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के, तर नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा आहे.
मोठय़ा, मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ३१ टक्के म्हणजेच ११ हजार २०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच वेळेला राज्यात आठ हजार ४५३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २३ टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता.
२००९ मध्ये हीच टक्केवारी १४ टक्के म्हणजेच पाच हजार ४९ दशलक्ष घनमीटर होती.
कोकणातील प्रकल्पांमध्ये ६३ टक्के, मराठवाडा २४ टक्के, नागपूर २८ टक्के, अमरावती ३० टक्के, नाशिक १८ टक्के आणि पुणे ३३ टक्के अशी पाणीसाठय़ाची टक्केवारी आहे. राज्यात एकूण ८३ मोठे प्रकल्प, २२२ मध्यम प्रकल्प, २११० लघुप्रकल्प आणि १४ इतर धरणे आहेत.
मोठय़ा प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता २१ हजार २८१ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत सहा हजार ६१५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता चार हजार ७८८ दशलक्ष घनमीटर इतकी असून आतापर्यंत एक हजार ४९३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
लघुप्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता चार हजार ५२० दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत ८९८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांमध्ये दोन हजार २०३ दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे.
स्त्रोत: ‘यंदा पाणीसाठा विक्रमी’ १४ जुलै २०११, लोकसत्ता
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमधील जलपातळीतः
२००५ आणि २००६ मधील जलपातळीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये निम्माच पाणीसाठा उपलब्ध असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अद्यापही तहानलेलेच आहेत.
मुंबईकरांना केवळ ५० दिवस पुरेल इतके पाणी या तलावांमध्ये उपलब्ध आहे.
काही दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे आजघडीला तलावांमध्ये ४ लाख ६ हजार ६९२ दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये (२०१० आणि २००९) या तलावांमधील जलसाठा दोन लाख दशलक्ष लिटरपेक्षाही कमी होता.
दरम्यान, २००५ आणि २००६ मध्ये आजच्या (१५ जुलै) दिवशी या तलावांमध्ये अनुक्रमे ८ लाख ६६ हजार ८०४ दशलक्ष लिटर व ८ लाख ४ हजार २५५ दशलक्ष लिटर इतका साठा उपलब्ध होता.
२००९ मध्ये असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. २००९ मध्ये आजच्या दिवशी १ लाख ८४ हजार ७८८ दशलक्ष लिटर, तर २०१० मध्ये १ लाख ८५ हजार १६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता.
स्त्रोत: ‘तलाव अद्यापही तहानलेले!’ १५ जुलै २०११, लोकसत्ता